
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#ब्रिटीशकालीन पुल काढुन नविन बांधण्यात येत आहे.याच ठिकाणचा पर्यायी पुल वाहुन गेला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कुसमळी गावाजवळ चोर्ला बेळगाव महामार्गावरील मलप्रभा नदीवर पूर्वी बांधण्यात आलेल्या ब्रिटीश कालीन पुलाला तडे गेल्याने पुल पाडण्यात आले. त्या ठिकाणी नविन पुल बांधण्यात येत आहे. पुलाचे बांधकाम अद्याप पुर्ण न झाल्याने त्यातच यंदा पावसाचे लवकर अगमन झाल्याने पुलाच्या कामात अडथळा निर्माण झाला. सध्या जांबोटी परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मलप्रभा नदीतुन पाण्याचा साठा वाढून शनिवारी वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे कुसमळी जवळील पर्यायी पुल वाहुन गेला. त्यामुळे बेळगाव चोर्ला वाहतुक खानापूर मार्गे तसेच बैलुर मार्गे वळविण्यात आली आहे.
पावसाळ्यात पुलाचे काम ठप्प !
सध्या पावसामुळे नविन पुलाचे काम ठप्प आहे.नविन पुल तयार होई तो पर्यत खानापूर मार्गे व बैलुर मार्गे वहातुक सुरू केल्यास याही रस्त्यांची भयंकर दुरावस्था निर्माण होणार आहे.