#खानापूरात १ लाख जनावरासाठी लाग,लंपी लसचा साठा!
#जनावराना लस घेण्याचे खानापूर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर दादमी यांचे आवाहन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
पशु खात्याच्यावतीने जनावराना लंपी रोगाची लस देणार्या कर्मचार्याना किटसचे वितरण नुकताच करण्यात आले. तालुक्यातील अनेक खेड्यात जनावराना लंपी रोगाची लस देण्यासाठी पशु खात्याच्या कर्मचार्याना उन्हात फिरत घरोघरी लस द्यावी लगाते. यासाठी पशुखात्याकडुन किटचे वाटप करण्यात आले.या किटमध्ये बॅग, टी शर्ट,पाण्याची बाॅटल व टोपी आदीचा समावेश आहे.
याकिटचे वितरण खानापूर पशुखात्याचे वैद्याधिकारी डाॅ.मनोहर दादमी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना वैद्याधिकारी डाॅ.मनोहर दादमी म्हणाले की,
खानापूर तालुका हा अति जंगलमय तालुका आहे.त्यामुळे तालुक्यातील जनावराची जोपना करणे अंत्यत गरजेचे आहे.यासाठी जनावराना लाग रोगीची, व लंपी रोगाची लस देणे गरजेचे आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावात लाग रोगीची व लंपी रोगीची लस पशु खात्याच्यावतीने देण्यात येत आहे.याचा लाभ शेतकरी वर्गाने घ्यावा. दुभत्या जनावराना लस देण्यास शेतकरी दुर्लक्ष करतात.कारण लस दिल्या नंतर जनावरे दुध कमी देतात हा गैरसमज आहे.कारण जनावराना रोगापासुन दुर ठेवण्यासाठी लस देणे गरजेचे आहे., तेव्हा नचुकता लस देण्याचे आवाहन केले.
यावेळी पशु वैद्याधिकारी डाॅ.मनोहर दादमी यांच्याहस्ते कर्मचार्याना किटचे वितरण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. .
.कार्यक्रमाला डाॅ. उमेश होसुर, डाॅ.चव्हाण, डाॅ.महादेव,डाॅ.आयाझ,डाॅ.शकुंतला व कर्मचारी उपस्थित होते.
खानापूर पशुवैद्यकीय खात्याकडे १ लाख जनावरासाठी लाग,लंपी लसीचा साठा!
या वेळी पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ.मनोहर दादमी म्हणाले की,तालुक्यातील जनावराना लाग, लंपी लस देण्यासाठी खानापूर पशूवैद्यकिय कार्यालयात व्हॅक्सीनसाठी वाकिंग कुलर फ्रिज मध्ये १ लाख जनावरासाठी लाग व लंपी रोगासाठी लस देण्याची सोय केली आहे.
एका बाॅटलमध्ये ५० जनावराना लस देता येते.
खानापूर तालुक्यात ४ सब सेंटर असुन मुख्य सेंटर खानापूर तर इतर चार जांबोटी,बिडी,गोधोळी,इटगी यासेंटर लाग,लंपी लस ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
उन्हा पासुन जनावराना जपा!
पशुधिकारी डाॅ.मनोहर दादमी,
सध्या कडक उन्हाळा आहे.तेव्हा शेतकरी बंधूनी शिवारात जोत काम करताना जनावराची काळजी घेणे गरजेचे आहे.तेव्हा शेतात पहाटे पासुन दुपारी ११ वाजेपर्यत जोत काम करावे.कडक उन्हात जोत काम करू नये.भर उन्हात जोत काम केल्यास जनावराना अँटक येऊ शकतो. तेव्हा सायंकाळी ४नंतर ७ वाजेपर्यत जोत करण्यास हरकत नाही. यासाठी भर उन्हात जोत काम करू नका.असे आवाहन करण्यात आले आहे.

