
#गटारी, रस्त्याची मागणी !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात पावसाच्या सुरूवातील नगरपंचायतीकडुन रस्त्याच्या दुतर्फा तसेच रस्ता स्वच्छता करण्याचे काम नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगाराकडुन शुक्रवारी दि.१३ रोजी करण्यात आले.
नुकताच पावसाला सुरूवात झाली आहे. खबदारीचा उपाय म्हणून नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारानी रस्त्याच्या दुतर्फावरील झुडपे, केरकचरा काढुन रस्ता स्वच्छ केला.त्यामुळे रस्त्याला शोभा आली. नागरीकातुन समाधान पसरले आहे.
#विद्यानगरात गटारी ,रस्त्याची समस्या अद्याप सुटली नाही!
गेल्या कित्येक वर्षापासुन विद्यानगरात लोकवस्ती असुन या भागात रस्त्याचे डांबरीकरण नाही.की सी सी रोड नाही. त्याचबरोबर गटारीची समस्या मोठी आहे
पावसाळा आला की,येथील रस्त्याची समस्या उदभवते. पावसाळ्यात पावसाचे पाणी गटारी नसल्याने रस्त्यावरून वाहते.त्यामुळे रस्त्याची दुर्दशा होते. जागोजागी खड्डे पडतात. चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे शाळकरी मुलाना ,वृध्दाना घरातुन बाहेर पडणे कठीण होते. वाहनाना येजा करणे तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे विद्यानगरात रस्ता व गटारी होणे अत्यंत गरजेचे आहे.
मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही.लोकप्रतिनिधी,नगरसेवकानी तसेच नगरपंचायतीच्या चीफ आँफिसरनी याकडे लक्ष देऊन समस्या दुर करावी.अशी मागणी याभागातील नागरीकांतुन होताना दिसत आहे.