“कौंदल पाठोपाठ रामगुरावडीत बैल जो डी चोरीच्या घटना”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात ऐन भात पेरणीच्या हंगामात शेतकर्याच्या बैलजोडी चोरीचे प्रकार घडल्याने शेतकरी वर्गातुन भितीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी दि.२२ रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान कौंदल( ता. खानापूर) गावचे शेतकरी मारूती गणपती पाटील यांच्या
मालकीची बैलजोडी होनकल कौंदल रस्त्यालगत असलेल्या शिवारातील घरातुन चोरीला गेल्याची घटना घडली.
तर शनिवारी दि.२३ रोजी रात्री रामगुरवाडी(ता.खानापूर ) येथील तुकाराम बाळू मोटर यांच्या मालकीची बैलजोडी गावापासुन दोन किलोमिटर अंतर असलेल्या शेतातील घरातुन चोरीस झाल्याची घटना घडली.
ऐन भात पेरणीच्या हंगामात शेतकर्याच्या बैलजोडी चोरी होण्याला चोरट्याची टोळी असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
कौंदल येथील शेतकरी मारुती पाटील यांनी भात पेरणीच्या हंगामासाठी बुधवारी ५० हजार रूपये देऊन बैलजोडी आणली होती. शुक्रवारी शेतातील घरात बैलजोडी बांधुन घरी आले होते.चोरट्यानी चावीचा शोध करून दरवाजाचा कुलुप काढुन बैलजोडी लंपास केली.
दुसरे दिवशी सकाळी मारूती पाटील यानी शेतातील घरात जा ऊन पाहातात तर गोठ्यात बैलजोडी जागेवर नसल्याचे निर्देशनास आले.लागलीच त्यानी परिसरात दिवसभर शोधाशोध केली.मात्र बैलजोडी चा मागमुस लागला नाही.
शनिवारी, रविवारी अनेक बैलाचे बाजार पालते घातले.अद्याप शोध लागला नाही.
ही घटना ताजी असताना च शनिवारी दि.२३ रोजी रामगुरवाडी येथील शेतकरी तुकाराम बाळू मोटर यांच्या मालकीची एक लाख रूपये किमतीची बैलजोडी गावा पासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या शेतातील घरातुन रात्री८वाजण्याच्या सुमारास चोरीला गेल्याची घटना घडली.
त्यामुळे खानापूर तालुक्यात बैलजोड्या चोरणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा सुरू आहे.
तेव्हा शेतकर्यानी सतर्क राहण्याची वेळ आली आहे.सदर घटनामुळे खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गातुन चिंतेचे वातावरण पसरले आहे.शेतीसाठी ऐन हंगामात महत्वाची असलेली जनावरे चोरीला जात असल्याने शेतकरीवर्गातुन भितीचे वातावरण पसरले आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यातील गावातुन रात्रीच्यावेळी पोलिसाची गस्त वाढविण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
दोन्हीही घटनेची नोंद संबधित पोलिस स्थानकात झीली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.
