
#शेतकर्यांचे जिल्हा मुख्य वनसंरक्ष अधिकार्याना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता.खानापूर ) गावच्या परिसरात पिल्लासह एका अस्वलाचा वावर होत असुन .त्याच्यापासुन शिवारात येजा करणार्या शेतकर्यांच्या जीवाला धोका आहे. त्या अस्वलाचा बंदोबस्त करावा.अशा मागणीचे निवेदन चापगांव परिसरात शेतकर्यानी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले यांच्या नेतृत्वा खाली बेळगांव जिल्हा मुख्य वनरक्षक अधिकार्याना दिले.
निवेदनात म्हटले आहे की,चापगांव परिसरात गेल्या काही दिवसापासुन एका अस्वलाने आपल्या पिल्लासह शिवारात धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे शिवारात येजा करणार्या शेतकर्यातुन भितीचे वातावरण पसरले आहे. या अस्वलापासुन शेतकर्याच्या जीवाला धोका संभवतो. तेव्हा या अस्वलाचा बंदोबस्त करावा.अशी मागणी
चापगाव, आल्लेहोळ,शिवोली व वड्डेबैल गावच्या शेतकर्यातुन होत आहे.
निवेदन देताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले अँड अभिजीत सरदेसाई विद्यमान सदस्य सूर्याजी पाटील कल्लाप्पा कोडेचवाढकर अभिजीत पाटील प्रभू कदम परसराम अंधारे विघ्नेश अंगडी आदित्य परशुराम येळगुळकर तसेच विठ्ठल मर्याणी पाटील गजू पाटील व इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.