शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये विद्याभारती राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न!
#३६ कराटे टीमचा समावेश !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील शांतीनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये राजस्तरीय विद्या भारती कराटे स्पर्धा शनिवारी दि १३ रोजी संपन्न झाल्या.
यावेळी राज्यातील ३६ कराटे टीमनी सहभाग दर्शविला.
स्पर्धाचे उदघाटन तोपिनकट्टी येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन इज्युकेशन सोसायटीचे संस्थापकव आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
कराटे स्पर्धा उदघाटन कार्यक्रमाला आर एस एस नेते अँड.सुभाष देशपांडे,श्री महालक्ष्मी ग्रुपचे संचालक विठ्ठल करंबळकर,चांगाप्पा निलजकर ,प्रमोद कोचेरी, कराटे पंच जितेंद्र काकतीकर, आदी उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्याच्या हस्ते विविध फोटोचे पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्या स्वातीकमल वाळवे यानी केले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की कराटे म्हणजे हातात कोणते ही शस्त्र नघेता सरंक्षणासाठी केलेली लढाई, आजच्या युगात कराटेच शिक्षण हे सर्वाना अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याने कराटेचे शिक्षण घेऊन आत्मसरक्षण करा.असे आवाहन केले.
यावेळी आर एस एस चे नेेते सुभाष देशपांडे यानी ही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संभाजी कदम यांनी केले.तर शांतिनिकेतन शिक्षण संस्थेचे पीआरओ सौ.मनिषा भोसले यानी आभार मानले.