
#खानापूर पोलिसस्थानकात शांतता बैठक संपन्न !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यंदा ही शनिवारी दि .७ जुन रोजी होणार्या बकरीद सन शांततेत व सुव्यवस्थित पार पाडा. कोणत्याही प्रकारचा गैर प्रकार होऊ नये.याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी.
असे आवाहन खानापूर पोलिस स्थानकाचे पी.आय. लालसाब गवंडी यानी शनिवारी दि.३१मे रोजी बोलविलेल्या शांतता बैठकीत केले.
प्रारंभी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत पी.आय. लालसाब गवडी यानी केेले.
यावेळी बोलताना भाजपचे युवा नेते पंडित ओगले म्हणाले की, खानापूर तालुका हा शांततामय तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात जाती धर्माबद्दल कोणत्याच प्रकाराचा वाद होत नाही.त्यामुळे सर्वच हिंदूचे मुसलमानचे सन शांततेत होत असतात.त्याच प्रमाणे उद्याचा बकरीद सन सुध्दा शांततेत पार पाडू.असे मत व्यक्त केले.
, रवी काडगी,मेघा कुंदरगी, आदीनी विचार व्यक्त केले.
यावेळी बैठकीला अमृत पाटील,एन सी तलवार , चंबन्ना होसमनी,नगरसेवक लक्ष्मण मादार, प्रकाश बैलूरकर,नारायण ओगले, तोहिद चांदखन्नावर, मजहर खानापूरी,नगरसेविका फातिमा बेपारी ,लता पाटील,काॅग्रेस शहर अध्यक्ष महांतेश राऊत,प्रकाश चव्हाण,नारायण काटगाळकर, आदी उपस्थित होते.
खानापूरातील चिकनसेंटर मधील वेस्टेज महामार्गावर!
खानापूर शहरातील प्रत्येक चिकन सेंटर मधील टाकाऊ माल (वेस्टेज) महामार्गावरील होनकल तसेच हेमाडगा रोड वर टाकला जातो.त्यामुळे याची दुर्गंधी पसरते.शिवाय महामार्गावर कुत्र्यांची खाण्यासाठी धावपळ सुरू असते.अशावेळी कुत्री धावत्या दुचाकी समोर येऊन आपघात होण्याचा संभव असतो. याकडे पोलिस खात्याने गांभिर्याने लक्ष देऊन चिकनसेंटर मालकाना सुचना कराव्यात अशी सुचना समाज सेवेक नारायण काटगाळकर यानी केले.
यावेळी पी आय.लालसाब गवंडी यानी यावर योग्य तो तोडगा काढु असे आश्वासन दिले.