
#सागरे ,नजिलकोडल ,दोडेबैल, बेकवाड,कुनकिकोप भागात पिकाचे नुकसान!
#वनखात्याचे अधिकारी, लोकप्रतिनिधीनीनी लक्ष देण्याची मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुुहास पाटील )
खानापूर तालुका हा अतिजंगलाचा तालुका म्हणुन ओळखला जातो.त्यामुळे खानापूर तालुक्याला जंगली प्राण्याकडुन पिकाचे प्रचंड नुकसान सातत्याने होत असते.
सध्या सुगीचे दिवस सुरू झाले आहेत.भात पिके शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेली आहेत.ऊस पिकेही आहेत.
असे असताना शुक्रवारी दि २५ रोजी हत्तरवाड जंगलातुन सागरे,कुनकीकोप,नजिलकोडल परिसरातील शिवारात हत्तीचे अगमन होऊन उस पिकाबरोबर भात पिकाचेही हत्तीकडुन नकसान होत आहे.
सध्या हातातोंडाशी आलेली भातपिक अचानक पडलेल्या पावसाने जमिन सपाट झाले आहे.त्यातच आता कुणकीकोप ,नंजीलकोडल ,सागरे दोडेबैल,बेकवाड भागात हत्ती आल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
एकीकडे पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असताना आता हत्तीच्या अगमनाने भात व उस पिकाचे आता प्रचंड नुकसान होणार.त्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे.
वनखात्याने,लोकप्रतिनिधीनी हत्तीच्या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे!
खानापूर तालुक्यात हत्तीचे अगमन काही नवीन नाही. मात्र ऐन सुगीच्या दिवसात हत्ती आला म्हणजे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार . तेव्हा वनखात्याने तसेच लोकप्रतिनिधीनी हत्तीला पिटाळुन लावण्यासाठी योग्यती कारवाई करावी .अन्यथा शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे हत्तीकडुन मोठ्याप्रमाणात नुकसान होणार याची काळजी शेतकरी वर्गाला आहे.