
#अनंत गावडे यांनी मांडली कैफियत!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील देगाव हेमाडग्यापासून पाच किलोमीटर असलेल्या देगाव रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून येजा करणे कठीण होणार आहे.
निवडणुक आल्या की निवडून ये पर्यंत मी हे करतो मी ते करतो असं सांगतात निवडून आल्यावर फिरकून सुद्धा कोण बघत नाहीत.
याची प्रचिती आज देगाव गावच्या नागरीकांना आली आहे.
असे मत देगावचे सामाजिक कार्यकर्ते अनंत गावडे यानी बोलून दाखविले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की या भागात कोणी पेशंट असला की अत्यंत बिकट प्रसंग उदभवतो. ह्या चिखलामुळे एखादे वाहन सुद्धा जात नाही. तेव्हा आमदारासह शासनाने लक्ष घालावे .सर्व पक्षाचे नेते आमदार सर्वे निवडून येईपर्यंत मी करतो आम्ही करतो असे म्हणतात. आणि भीमगड अरण्यामुळे तिकडे कोणी फिरकुन ही बघत नाही .कुणी ही लक्ष घालत नाही कुणाला पण विचारलं तर सांगतात गाव उठणार आहे.असं उत्तर देतात . गाव उठून प्रत्येक कुटुंबाला पंधरा लाख देण्यापेक्षा तेवढ्या निधीतुन रस्ता, लाईट इतर सोयी कराव्यात.
सध्या या रस्त्याची दुरावस्था पाहुन येत्या पावसाळ्यात देगांव नागरीकानी पावसाळा कसा काढावा.असा यक्ष प्रश्न सर्वाना पडला आहे.