
# औषध उपचारासाठी वनखात्याकडुन ४० हजार रूपये मदत परत करण्याच्या अटीवर !
#घाडी फाऊंडेशनच्या वतीने ही मदत!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
सोमवारी दि २ डिसेबर रोजी कणकुंबी वनिवभागातूल मान (ता.खानापूर ) येथील शेतकरी सखाराम महादेव गावकर हा दोन अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.
त्याच्या डाव्या पायचा अस्वलानी चिंधडया केल्या त्यामुळे बेळगाव येथील हाॅस्पिटलमध्ये उपचार दरम्यान पाय निकामी करावा लागला.
अस्वलांचा हल्ला!
मान गावचा शेतकरी पत्नी सह शेतात काम करत असताना दोन अस्वलानी हल्ला चढविला.यावेळी प्रसंगावधान राखुन पत्नीला अस्वालाशी झुंज देत पत्नी झाडावर चढविण्यास सांगीतले.नंतर आपण झाडवर चढताना डाव पाय अस्वलाने तोंडाने फोडुन चिंध्या केल्या तशातच हातातील कायत्याने वार करून सुटका करून घेतली.
अस्वले जंगलात पळुन गेल्या नंतर पत्नीने झाडावरून मोबाईल वरून मुलगीला बातमी कळविली. व स्वता झाडावरून उतरून पतीला पाठीवर बसुन काही अंतरावर गेल्यावर गावकर्यानी येऊन लागलीच बेळगाव हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.
यावेळी डाॅक्टरनी पाय काढण्याचा सल्ला दिला.सदर शेतकर्याची परिस्थिती फारच हल्याख्याची आहे.
# वनखात्याकडुन ४० हजार रूपयाची मदत मात्र सरकारी निधी मिळताच परत करण्याची अट!
मान ( ता.खानापूर ) येथील शेतकरी सखाराम गावकर याचा अस्वलाच्या हल्ल्यात पाय निकामी झाला.घरची परिस्थिती हल्याक्याची असल्याने वनखात्याकडुन ४० हजार रूपयाची मदत करण्यात आली.मात्र सरकारी निधी येताच ४० हजार रूपये परत करण्याची अट वन अधिकार्यानी केली असल्याचे बोलले जात आहे.
काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडीची हाॅस्पिटलमध्ये विचारपूस व आर्थिक मदत!
गरीब शेतकरी अस्वलांच्या हल्यात गंभीर जखमी होऊन पाय निकामी झाल्याची माहिती मिळताच खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी बेळगाव हाॅस्पिटलमध्ये जाऊन शेतकर्याची भेट घेतली.
यावेळी संबधीत वनखात्याकडुन शेतकर्याला काॅग्रेस पक्षाच्यावतीने सरकारकडे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगुन कमीत कमी १५ लाख रूपये नुकसान भरपाई मिळावी.
असे सांगुन स्वत: घाडी फाऊंडेशनच्यावतीने शेतकर्याला आर्थिक मदत केली. असल्याचे सांगीतले. गरीब शेतकर्याची परिस्थिती हल्याख्याची आहे.तेव्हा सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यानी केले.
यावेळी खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी सह अँड.बाळेकुंद्री,खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर व इतर काॅग्रेसचे नेते उपस्थित होते.
वनखात्याकडुन निधी मिळवुन द्यावा.
मानच्या शेतकर्याला अस्वलच्या हल्ल्यात पाय निकामी करावा लागला. गरीब परिस्थितीत दवाखान्याचा खर्च दिवसेदिवस वाढत चालला आहे. परिस्थिती हल्याक्याची आहे.
तेव्हा वनखात्याने निधी मंजुर करून आर्थिक मदत करावी.अन्यथा वनखात्याच्या कार्यालयालया येत्या काही दिवसात टाळे ठोकण्यात येथील असे आवाहन केपीसीसी सदस्य महादेव कोळी यानी केले आहे.