
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
शिरोली (ता. खानापूर ) येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाला बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी (डी डी पी आय.) श्रीमती लिलावती हिरेमठ यांनी बुधवारी भेट देऊन नुकताच झालेल्या दहावी परीक्षेेच्या निकालाची टक्केवारी वाढविण्यासंदर्भात शिक्षकाना व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.यावेळी सरकारी माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळा शिक्षकांची बैठकीचे आयोजन करण्यात आले.
शिरोली परिसर हा अतिजंगलाने व्यापलेला ,दुर्गम व मागासलेला भाग आहे.शिरोली हायस्कूलमध्ये तेरेगाळी खेड्यातुन येणार्या विद्यार्थ्याशी डी डी पी आय.श्रीमती.लिलावती हिरेमठ यांनी संवाद साधला.त्यावेळी तेरेगाळीचे विद्यार्थी हे ५ ते६ किलोमिटर अंतर चालत येजा करत शिक्षण घेतात.अशी माहिती समोर येताच लागलीच डीडीपीआय श्रीमती लिलावती हिरेमठ यानी तेरेगाळीच्या दोन विद्यार्थ्याना सायकल खरेदीसाठी सीआरपी बी ए देसाई यांच्याकडे चक्क १० हजार रूपये रोख रक्कम देऊण खानापूर तालुक्याच्या ठिकाणी जाऊण लागलीच सायकली खरेदी केल्या. व विद्यार्थ्याना सुपूर्द केल्या.
# तालुक्यातील ही पहिली घटना!
खानापूर तालुका हा अति दुर्गम मागासलेला तालुका अशा तालुक्याला आज पर्यत अनेक अधिकारी येऊन गेले. परंतु विद्यार्थ्याशी इतकी तळमळ असणारे जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ या एकमेव अधिकारी ठरल्या आहेत.त्यानी कोणताच विचार न करताच लागलीच तेरेगाळी विद्यार्थ्याची सायकल देऊन सोय केली. त्याबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ याच्या कार्याबद्दल खानापूर तालुक्यातुन कौतुक होत आहे.
# सरकारच्या सायकल वितरणाची आठवण!
दर वर्षी इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्याना सायकलीचे वितरण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची गैर सोय दुर होत होती. परंतु अलिकडे विद्यार्थ्याना सायकल वितरण योजना बंद पडली. मात्र योजनेची आठवण जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ यानी तेरेगाळी गावच्या विद्यार्थ्याना सायकलीचे वितरण करून सरकारच्या सायकल वितरणाची आठवण जागे केली.