
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावच्या बिर्जे शिवारात सरकारी नाल्यावर वेंटेद डॅम चे काम त्वरित पूर्ण करा. अशा मागणीचे निवेदन गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे सदस्य प्रसाद पाटील यांनी तालुका सहायक कृषी निर्देशक सतीश माविनकोप याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की गर्लगुंजी गावातील ७० ते ८० एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न सुटणार आहे.रोजगार हमी योजने अंतर्गत हे काम ग्राम पंचायत कडून घालण्यात आले होते . पण ही कामे कृषी खात्याकडे येत असल्याने या कामाला वेळ झाला. काही तांत्रिक अडचणी मुळे ह्या कामाला उशीर झाल्याचे निर्देशक म्हणाले.तांत्रिक अडचणी दूर करून इमर्जंन्सी बेसिस वर हे काम करावे ,जिल्हा पंचायत कडून निर्देश घेऊन हे काम त्वरित करावे आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे ,काम त्वरित पूर्ण न झाल्यास कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे प्रसाद पाटील यांनी सांगितले.यावेळी कृषी अधिकारी चिकमठ, युवा काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार,दिगंबर खांबले उपस्थित होते..